भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान शुक्रवारी रात्री पाकिस्तानमधून भारतात परतले. तब्बल 58 तासांहून जास्त वेळ पाकच्या ताब्यात राहिलेले अभिनंदन वाघा-अटारी सीमेवरून भारतात आल्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भारताचे मिग 21 विमान कोसळल्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना जिनिव्हा करारानुसार भारताकडे सुपुर्द करण्यात आलं.



Post A Comment:
0 comments so far,add yours