मुंबई, 10 मार्च: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात चार टप्प्यात मतदान होणार आहे. यातील 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार आहे. 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 10 जागांवर होणार मतदान आहे. तिसऱ्या म्हणजे 23 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील 14 जागांवर मतदान होणार आहे. तर चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 जागांवर मतदान होणार आहे. जाणून घ्या राज्यातील कोणत्या मतदारसंघात केव्हा मतदान होणार आहे.
11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम
18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड उस्मानाबाद लातूर, सोलापूर
23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान-
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान
नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर,शिर्डी



Post A Comment:
0 comments so far,add yours